तळोजातील सामुहिक आत्महत्या प्रकरण... मृत व्यापाऱ्याच्या दोघा भावाची पोलिसांकडून चौकशी


नवी मुंबई (प्रतिनिधी)ऑनलाइन व्यवसाय करणाऱ्या एका व्यापाऱ्याने पत्नी व दोन मुलांची हत्या करून नंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तळोजा भागात घडली आहे. हे कुटुंब भाडेतत्त्वावर राहत होते. फ्लॅटमालक भाडे घेण्यासाठी आला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान, मृत व्यापारी नितेश उपाध्याय हा मुळचा दिल्लीमधील रहिवाशी असून या घटनेची माहिती मिळताच दिल्लीहन नवी मुबईत आलेल्या त्याच्या दोघा भावांकडून अधिक माहिती घेण्याचे काम सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांनी दिली. आत्महत्या करणा-या व्यापाऱ्याचे नाव नितेशकुमार उपाध्याय (३०) असे आहे. त्याने पत्नी बबली देवी (३०) तसेच आठ वर्षांची मुलगी व नंतर स्वतः आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. मृतदेहांची अवस्था पाहता ही घटना घडून एक दिवसापेक्षाही जास्त _कालावधी झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. राजेंद्र भारद्वाज यांच्या मालकीचा सदरचा फ्लॅट असून भाडोत्री फोन करून सुद्धा फोन घेत नसल्याने घरमालक राजेंद्र भारद्वाज हे भाडे घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी असता, आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी सोसायटी ऑफिसमध्ये जाऊन अध्यक्षांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर सोसायटी मधील कर्मचारी यांनी इप्लिकेट _चावीने दरवाजा उघडला असता, आतील प्रकार पाहून सर्वांनाच धक्का बसला. यात नितेश उपाध्याय यांनी पंख्याला गळफास घेतला होता तर अन्य तिघांचे मृतदेह घरात वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते. फ्लॅटमध्ये एक सुसाइड नोट आढळली असून त्यात 'सोने आणि रोख रक्कम बेडरूममध्ये ठेवण्यात आली आहे' असे नमूद करण्यात आले आहे. हिंद पद्धतीने आमच्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत, असेही या नोटमध्ये लिहिले आहे.