मुंबई (प्रतिनिधी) - निरंकारी सद्गगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात महाराष्ट्राचा 55 वा वार्षिक निरंकारी संत समागम दिनांक 11, 12 व 13 फेब्रुवारी,2022 रोजी व्हर्च्युअल रुपात आयोजित करण्यात आला आहे. या संत समागमाचा भरपूर आनंद जगभरातील समस्त भाविक भक्तगण आपापल्या घरातूनच ऑनलाईनच्या माध्यमातून घेऊ शकतील.
दरवर्षी नववर्षाचे आगमन होताच संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील समस्त भाविक-भक्तगणांना भक्ती, प्रेम व आनंद यांच्या अद्भुत संगमाची अलौकिक अनुभूती प्रदान करणार्या या संत समागमाची प्रतिक्षा असते. मागील वर्षी महाराष्ट्र समागमाचे चित्रण अगोदर करण्यात आले होते व त्यानंतर ते व्हर्च्युअल रुपात प्रसारित करण्यात आले. मात्र, यावर्षी या समागमाचे थेट प्रक्षेपण मिशनच्या वेबसाईटवर सायंकाळी 5.00 ते रात्री 9.30 आणि साधना टी.व्ही.चॅनलवर सायंकाळी 6.00 ते रात्री 9.30 या वेळात करण्यात येणार आहे. उल्लेखनीय आहे, की इतिहासामध्ये प्रथमत:च महाराष्ट्राच्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे तसेच समागमाच्या दुसर्या दिवशी दुपारी 12.00 ते 2.00 या वेळात होणार्या सेवादल रॅलीचेही थेट प्रक्षेपण मिशनची वेबसाईट आणि साधना टी.व्ही.चॅनलवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.यावर्षीचा संत समागम विश्वास, भक्ती, आनंद’ या विषयावर आधारित आहे.
वैश्विक महामारी कोविड-19 चा प्रभाव अद्याप पूर्णपणे नाहीसा झालेला नाही. ही बाब ध्यानात घेऊन संत समागमाची पूर्वतयारी पूर्ण समर्पण भावनेने व जागरुकपणे सरकारकडून जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत केली जात आहे. समागमाच्या आयोजनात भाग घेणार्या सेवादारांकडून थर्मल स्क्रीनिंग, मास्क, सॅनिटायझेशन व सामाजिक अंतर याबाबतच्या नियमांचे यथायोग्य पालन केले जात आहे. याशिवाय समागमाच्या कार्यक्रमात भाग घेणार्यांची कोविड (ठढ-झउठ, ठरळिव -पींळसशप ढशीीं) चाचणीदेखील केली जात आहे. त्यांच्यासाठी कोविड-19 च्या दोन लसी घेतलेल्या असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
समागमाचा प्रारंभ शुक्रवार, दि.11 फेब्रुवारी, 2022 रोजी सायंकाळी 5.00 वाजता होणार असून त्यामध्ये सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज मानवतेच्या नावे संदेश’ (चशीीरसश ींे चरपज्ञळपव) प्रदान करतील. सत्संग कार्यक्रम रात्री 9.00 वाजेपर्यंत चालत राहील व त्यानंतर 9.00 ते 9.30 दरम्यान सद्गुरु माताजी आपल्या पावन प्रवचनाद्वारे आपले आशीर्वाद प्रदान करतील. समागमाच्या दुसर्या दिवशी शनिवार दि.12 फेब्रुवारी, 2022 रोजी दुपारी 12.00 ते 2.00 या वेळात एक रोमहर्षक सेवादल रॅली संपन्न होईल. रॅलीची सांगता सदगुरु माताजींच्या पावन आशीर्वचनांद्वारे होईल. त्यानंतर सायंकाळी 5.00 वाजता सत्संगाचा कार्यक्रम सुरु होईल ज्याचे समापन रात्री 9.00 ते 9.30 दरम्यान सद्गुरु माताजींच्या प्रवचनाद्वारे होईल. समागमाच्या तिसर्या दिवशी, रविवार दि.13 फेब्रुवारी, 2022 रोजी सायंकाळी 5.00 वाजता सत्संगाचा कार्यक्रम सुरु होईल ज्यामध्ये एक बहुभाषी कवी संमेलन’ आयोजित केले जाईल. शेवटी, सद्गुरु माताजींच्या दिव्य प्रवचनाद्वारे समागमाची सांगता होईल. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संत समागमाच्या निमित्ताने विश्वास, भक्ती, आनंद’ या विषयावर एक विशेष स्मरणिका प्रकाशित करण्यात येत असून त्यामध्ये हिंदी, इंग्रजी, पंजाबी, मराठी, गुजराती तसेच नेपाळी भाषांतून अनुभवी संतांचे सारगर्भित लेख वाचायला मिळतील. हे लेख भक्तगणांना आपली भक्ती सदृढ करण्यासाठी आणि नवीन जिज्ञासूंना सन्मार्गाकडे वळण्याकरिता प्रेरणादायी ठरतील.